भगवान श्रीकृष्ण येथे जीवाचे स्वतंत्र अस्तित्व भौतिक नसून आध्यत्मिक आहे हे स्पष्ट करतात. भौतिक अस्तित्व तर शरीर नष्ट झाल्यावर संपुष्टात येते मग कुठले अस्तित्व हे शरीर नष्ट झाल्यावरही आबाधित राहते? ते म्हणजे आध्यत्मिक अस्तित्व. म्हणून येथे भौतिक नाही तर आध्यत्मिक अस्तित्वाच्या स्वतंत्रते विषयी सांगितले आहे, जे कधीच संपुष्टात येत नाही.