दासबोध हा समर्थ रामदासांनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींनी केले. रायगड जिल्ह्यातील अत्यंत निबीड अरण्यात विसावलेल्या शिवथरची घळ या ठिकाणी हे लेखन झाले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.