बेधुंद मनाची लहर , लहरींच्या होती लाटा
लाटा या झेलतांना दुःखांना फुटली फाटा
दुःखाच्या या वळणावरती मी नेहमीच एकटी आहे ,
कधी स्वतःला धडपडताना बघत आहे
तर कधी स्वतःच स्वतःला सावरून घेत आहे,
अनुभवाच्या आलेखाने एक गोष्ट शिकवली
भूक लागल्यावर पाण्याने मात्र भूक वीजवली.
आपले म्हणावे असे कोणीच या जगात नसते ,
लहरींच्या या लाटेवरती फक्त फसवे जग वसते .