कारगिल युद्धाची शौर्य कथा आठवली तरी आपल्या अंगावर शहारे येतात. कितीतरी सैनिकांनी त्यांचे आयुष्य आपल्या देशाला समर्पित केले. त्यांच्यातील एका योद्ध्याची गोष्ट या चित्रपटात दाखवलेली आहे त्यांचे नाव शेरशाह म्हणजेच कॅप्टन विक्रम बत्रा. या चित्रपटापेक्षा जास्त चर्चा 'भुज' या चित्रपटाची होती, पण हा चित्रपट अनेपक्षितपणे सगळ्यांचे मन जिंकतो. चित्रपटाचे सादरीकरण, दिग्दर्शन छान झालेलं आहे. वास्तविक घटना दाखवल्या आहेत. कमी animations टाकल्यामुळे हा चित्रपट बघायला मजा येते. अधिक माहिती साठी हे पॉडकास्ट ऐका.