परमपवित्र, वेदतुल्य अशा श्री गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायात काही रहस्य दडलेलं आहे. गुरुचरित्रात श्री नृसिंह स्वामींनी अनेक लोकांचा उद्धार केल्याच्या कथा आहेत. या ग्रंथातील ३८ व्या अध्यायात, भक्तीमार्गाचं अनुसरण केल्यामुळे भास्कर नावाच्या गृहस्थाचं कसं सर्वार्थानं कल्याण झालं, याविषयी आज ऐकणार आहोत. यातच दडलेला आहे, श्री गुरुचरित्रात दडलेला एक विलक्षण संदेश, जो परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज यांनी सर्वांसाठी उलगडून दाखवला आहे.