
Sign up to save your podcasts
Or


"यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करितील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरितील." - (यशया 25:3)
यशया तो दिवस पाहत आहे जेव्हां सर्व राष्ट्रे - सर्व लोक गटांचे प्रतीनिधीं - इस्राएलचा देव याव्हे व त्याचा मसीहा, ज्याला आपण येशू म्हणून ओळखतो, यांच्या बरोबर त्यांचे शत्रुत्व असणार नाहीं.
ते या पुढे बआल किंवा निबो किंवा मोलेख किंवा अल्लाह किंवा बुद्ध किंवा काल्पनिक आदर्श जग निर्माण करण्या करिता असलेले सामाजिक कार्यक्रम किंवा आर्थिक विकास किंवा पूर्वजांची किंवा निसर्गाची भक्ति करणार नाहींत. या ऐवजी ते विश्वासाने देवाच्या पर्वतावर मेजवानीकरिता येतील.
आणि त्यांच्या दु:खाचा पडदा काढून टाकींलेला असेल आणि मरण नाहींसे झालेलें असेल आणि देवाच्या लोकांची निंदा काढून टाकली गेलेली असेल आणि त्यांचे अश्रु कायमचे पुसून टाकलेले असतील.
यशया 25:3 मधील द्रुष्टांत समजून घेण्याकरिता त्याची ही पार्श्वभूमी समजणे गरजेचे आहे. "यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करितील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरितील." दुसर्या शब्दात, देव हा "आडदांड" लोकांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे, आणि तो इतका बलवान आणि कृपाळू आहे कीं शेवटी तो निर्दयी अशा राष्ट्रांना देखील त्याची भक्ति करायला भाग पाडील.
यशया जे चित्र दाखवत आहे त्यात, सर्व राष्ट्रे देवाची भक्ती करित त्याचाकडें वळाली आहेत, जे त्याचें लोक झाले आहेत त्या सर्व लोकांकरिता मोठी मेजवानी ठेवली आहे, राष्ट्रांमधून सर्व यातना, दु:ख आणि अपमान नाहींसा केला गेला आहे, आणि शेवटी मरण कायमचे नाहींसे केलें गेले आहे.
हा विजय निश्चित आहे, कारण देवच हे सर्व करीत आहे. त्यामुळे आपण याची खात्री बाळगू शकतो.
जगात सुवार्ता प्रसाराकरिता खर्च केलें गेलेले एकही जीवन व्यर्थ ठरणार नाहीं, देवाच्या राज्याच्यावाढीसाठीं केलेंली एकही प्रार्थना किंवा खर्च केलेंला एक रुपया किंवा एक संदेश किंवा उत्तेजनासाठीं लिहिलेले एक पत्र किंवा अंधारात प्रकाशणारा एक लहानसा दिवा देखील व्यर्थ ठरणार नाहीं. विजय हा निश्चत आहे.
By Alethia4India"यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करितील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरितील." - (यशया 25:3)
यशया तो दिवस पाहत आहे जेव्हां सर्व राष्ट्रे - सर्व लोक गटांचे प्रतीनिधीं - इस्राएलचा देव याव्हे व त्याचा मसीहा, ज्याला आपण येशू म्हणून ओळखतो, यांच्या बरोबर त्यांचे शत्रुत्व असणार नाहीं.
ते या पुढे बआल किंवा निबो किंवा मोलेख किंवा अल्लाह किंवा बुद्ध किंवा काल्पनिक आदर्श जग निर्माण करण्या करिता असलेले सामाजिक कार्यक्रम किंवा आर्थिक विकास किंवा पूर्वजांची किंवा निसर्गाची भक्ति करणार नाहींत. या ऐवजी ते विश्वासाने देवाच्या पर्वतावर मेजवानीकरिता येतील.
आणि त्यांच्या दु:खाचा पडदा काढून टाकींलेला असेल आणि मरण नाहींसे झालेलें असेल आणि देवाच्या लोकांची निंदा काढून टाकली गेलेली असेल आणि त्यांचे अश्रु कायमचे पुसून टाकलेले असतील.
यशया 25:3 मधील द्रुष्टांत समजून घेण्याकरिता त्याची ही पार्श्वभूमी समजणे गरजेचे आहे. "यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करितील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरितील." दुसर्या शब्दात, देव हा "आडदांड" लोकांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे, आणि तो इतका बलवान आणि कृपाळू आहे कीं शेवटी तो निर्दयी अशा राष्ट्रांना देखील त्याची भक्ति करायला भाग पाडील.
यशया जे चित्र दाखवत आहे त्यात, सर्व राष्ट्रे देवाची भक्ती करित त्याचाकडें वळाली आहेत, जे त्याचें लोक झाले आहेत त्या सर्व लोकांकरिता मोठी मेजवानी ठेवली आहे, राष्ट्रांमधून सर्व यातना, दु:ख आणि अपमान नाहींसा केला गेला आहे, आणि शेवटी मरण कायमचे नाहींसे केलें गेले आहे.
हा विजय निश्चित आहे, कारण देवच हे सर्व करीत आहे. त्यामुळे आपण याची खात्री बाळगू शकतो.
जगात सुवार्ता प्रसाराकरिता खर्च केलें गेलेले एकही जीवन व्यर्थ ठरणार नाहीं, देवाच्या राज्याच्यावाढीसाठीं केलेंली एकही प्रार्थना किंवा खर्च केलेंला एक रुपया किंवा एक संदेश किंवा उत्तेजनासाठीं लिहिलेले एक पत्र किंवा अंधारात प्रकाशणारा एक लहानसा दिवा देखील व्यर्थ ठरणार नाहीं. विजय हा निश्चत आहे.