
Sign up to save your podcasts
Or


ज्या अर्थी ‘मुलें’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणानें शून्यवत करावे, आणि जें मरणाच्या भयानें आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. (इब्रीलोकांस 2:14-15)
येशू मानव झाला कारण जी गोष्ट अगत्याची होती ती म्हणजें एका अशा मनुष्याचा आत्मयज्ञ जो स्वतः मनुष्यापेक्षा श्रेष्ठ असा आहे. देही होणें म्हणजें देवानें स्वतःला मरणाच्या नांगीच्या अंकित केलें.
ख्रिस्तानें मृत्यूचा धोका पत्करला नाहीं. त्यानें मृत्यू निवडला. त्यानें मरणाला मिठी मारली. म्हणूनच तो आला: “सेवा करून घेण्यास नाहीं, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठीं आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे” (मार्क 10:45).
येशूनें वधस्तंभापासून माघार घ्यावी म्हणून सैतानाने खूप प्रयत्न केला यात काही आश्चर्य नाहीं — अरण्यांत (मत्तय 4:1-11) आणि पेत्राच्या तोंडून (मत्तय 16:21-23)! वधस्तंभ हा सैतानाचा नाश होता. येशूनें त्याचा नाश कसा केला?
इब्रीलोकांस 2:14 म्हणते कीं सैतान “मरणावर सत्ता गाजवतो.” याचा अर्थ, सैतानाकडें मरणाला घाबरून टाकणारं रौद्र रूप देण्याचे सामर्थ्य आहे. "मरणाचे सामर्थ्य" हे असें सामर्थ्य आहे जे मरणाच्या भीतीने मनुष्यांना गुलाम बनवते. ते मनुष्यांना पापात ठेवण्याची ही शक्ती आहे जेणेंकरून मरण एक भयानक सत्य म्हणून प्रकट व्हावें.
पण येशूनें सैतानाचे हे सामर्थ्य काढून त्याला शून्यवत केलें. त्याला नि:शस्त्र केलें. त्यानें आपल्यासाठीं नीतिमत्वाचे एक कवच तयार केलें जे आपल्याला सैतानाच्या दोषारोपापासून मुक्त करते. त्यानें हे कसे केलें?
त्याच्या मरणाने, येशूनें आपली सर्व पापे पुसून टाकली. आणि पाप नसलेल्या मनुष्याला सैतान दोषी ठरवू शकत नाहीं. पापांची क्षमा झालेंलें, असें आपण शेवटी अविनाशी झालों आहों. देवाच्या स्वतःच्या न्यायालयात देवाच्या लोकांवर दोष लाऊन देवाच्या राज्याचा नाश करावा हे सैतानाचे कारस्थान होते. पण आता, ख्रिस्तामध्यें, दंडाज्ञा नाहींच. सैतानाचा राजद्रोह धूळीस मिळविण्यात आला आहे. जगाचा घात करण्याचा त्याचा डाव हाणून पाडण्यात आला आहे. "त्याचा रोष आपण सहन करू शकतो, कारण पाहा त्याचा नाश येऊन पोहचला आहे." वधस्तंभाने त्याचा पराभव केला आहे. आणि ती वेळ येत आहे जेव्हां तो आपला शेवटला श्वास घेईल.
नाताळ स्वातंत्र्यासाठीं आहे. मरणाच्या भीतीपासून मुक्तता.
येशू बेथलेहेममध्यें आमच्यांसारखा रक्तमांसाचा झाला, येरूसलेमात आमच्या मरणाचा स्थानापन्न झाला – यासाठीं कीं आज आम्हीं आमच्या नगरांत निर्भयपणें वावर करूं शकू. होय, निर्भयपणें. कारण माझ्या आनंदाला असलेला सर्वात मोठा धोका जर नाहींसा झाला, तर मी चिमुरड्यांवर का जळफळावे? तुम्हीं असें कसे म्हणू शकता (खरोखर का!), "बरें, मला मरण्याची भीती वाटत नाहीं, पण मला माझी नोकरी गमावण्याची भीती वाटते"? नाहीं. नाहीं. विचार करा!
जर मरणाची (मी म्हणालो, मरण! — नाडीचा ठोका किंवा सर्दी गेली हे नाहीं!) जर मरणाची यापुढे भीती नाहीं, तर आपण स्वतंत्र आहों, खरोखर स्वतंत्र आहों. ख्रिस्तासाठीं आणि त्याच्या प्रीतिसाठीं या जगांत कोणताहि धोका पत्करण्यास स्वतंत्र. आता चिंतेची गुलामगिरी नाहीं.
जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्हीं खरेखुरे बंधमुक्त व्हाल!
By Alethia4Indiaज्या अर्थी ‘मुलें’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणानें शून्यवत करावे, आणि जें मरणाच्या भयानें आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. (इब्रीलोकांस 2:14-15)
येशू मानव झाला कारण जी गोष्ट अगत्याची होती ती म्हणजें एका अशा मनुष्याचा आत्मयज्ञ जो स्वतः मनुष्यापेक्षा श्रेष्ठ असा आहे. देही होणें म्हणजें देवानें स्वतःला मरणाच्या नांगीच्या अंकित केलें.
ख्रिस्तानें मृत्यूचा धोका पत्करला नाहीं. त्यानें मृत्यू निवडला. त्यानें मरणाला मिठी मारली. म्हणूनच तो आला: “सेवा करून घेण्यास नाहीं, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठीं आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे” (मार्क 10:45).
येशूनें वधस्तंभापासून माघार घ्यावी म्हणून सैतानाने खूप प्रयत्न केला यात काही आश्चर्य नाहीं — अरण्यांत (मत्तय 4:1-11) आणि पेत्राच्या तोंडून (मत्तय 16:21-23)! वधस्तंभ हा सैतानाचा नाश होता. येशूनें त्याचा नाश कसा केला?
इब्रीलोकांस 2:14 म्हणते कीं सैतान “मरणावर सत्ता गाजवतो.” याचा अर्थ, सैतानाकडें मरणाला घाबरून टाकणारं रौद्र रूप देण्याचे सामर्थ्य आहे. "मरणाचे सामर्थ्य" हे असें सामर्थ्य आहे जे मरणाच्या भीतीने मनुष्यांना गुलाम बनवते. ते मनुष्यांना पापात ठेवण्याची ही शक्ती आहे जेणेंकरून मरण एक भयानक सत्य म्हणून प्रकट व्हावें.
पण येशूनें सैतानाचे हे सामर्थ्य काढून त्याला शून्यवत केलें. त्याला नि:शस्त्र केलें. त्यानें आपल्यासाठीं नीतिमत्वाचे एक कवच तयार केलें जे आपल्याला सैतानाच्या दोषारोपापासून मुक्त करते. त्यानें हे कसे केलें?
त्याच्या मरणाने, येशूनें आपली सर्व पापे पुसून टाकली. आणि पाप नसलेल्या मनुष्याला सैतान दोषी ठरवू शकत नाहीं. पापांची क्षमा झालेंलें, असें आपण शेवटी अविनाशी झालों आहों. देवाच्या स्वतःच्या न्यायालयात देवाच्या लोकांवर दोष लाऊन देवाच्या राज्याचा नाश करावा हे सैतानाचे कारस्थान होते. पण आता, ख्रिस्तामध्यें, दंडाज्ञा नाहींच. सैतानाचा राजद्रोह धूळीस मिळविण्यात आला आहे. जगाचा घात करण्याचा त्याचा डाव हाणून पाडण्यात आला आहे. "त्याचा रोष आपण सहन करू शकतो, कारण पाहा त्याचा नाश येऊन पोहचला आहे." वधस्तंभाने त्याचा पराभव केला आहे. आणि ती वेळ येत आहे जेव्हां तो आपला शेवटला श्वास घेईल.
नाताळ स्वातंत्र्यासाठीं आहे. मरणाच्या भीतीपासून मुक्तता.
येशू बेथलेहेममध्यें आमच्यांसारखा रक्तमांसाचा झाला, येरूसलेमात आमच्या मरणाचा स्थानापन्न झाला – यासाठीं कीं आज आम्हीं आमच्या नगरांत निर्भयपणें वावर करूं शकू. होय, निर्भयपणें. कारण माझ्या आनंदाला असलेला सर्वात मोठा धोका जर नाहींसा झाला, तर मी चिमुरड्यांवर का जळफळावे? तुम्हीं असें कसे म्हणू शकता (खरोखर का!), "बरें, मला मरण्याची भीती वाटत नाहीं, पण मला माझी नोकरी गमावण्याची भीती वाटते"? नाहीं. नाहीं. विचार करा!
जर मरणाची (मी म्हणालो, मरण! — नाडीचा ठोका किंवा सर्दी गेली हे नाहीं!) जर मरणाची यापुढे भीती नाहीं, तर आपण स्वतंत्र आहों, खरोखर स्वतंत्र आहों. ख्रिस्तासाठीं आणि त्याच्या प्रीतिसाठीं या जगांत कोणताहि धोका पत्करण्यास स्वतंत्र. आता चिंतेची गुलामगिरी नाहीं.
जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्हीं खरेखुरे बंधमुक्त व्हाल!