आमदार आचार्य अत्रे यांची विधान सभेतील भाषणे आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात .आचार्य अत्रे यांच्या पहाडी व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात महाराष्ट्र का पडला हे पुस्तक वाचल्यावर कळतं. त्यांचं मद्द्यप्रेम त्यांनी कधीही लपवलं नाही. विधानसभेत त्यांनी दारूबंदीचा निषेध करताना केलेलं भाषण आपली चांगलीच करमणूक करत .संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी केंद्र सरकारला आपल्या घणाघाती भाषणांनी जेरीला आणल. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात आचार्य अत्रे यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे .