विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने तिसर्या दिवशी बुधवारी प्रशासन अहवालाचे परीक्षण केले असताना गेल्या 14 वर्षांपासून काही ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण झालेले नाही. तर काही ग्रामपंचयतींमध्ये अपहार आणि अनियमितेमुळे ग्रामपंचायत विभागाच्या अधिकार्यांना फैलाव घेत किती दिवसात पूर्तता पूर्ण करणार, अशी विचारणा करीत अधिकार्यांना घाम फोडला.