भाषा, वाड्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड' द्वारे आयोजित नारायण भोसले लिखित 'देशोधडी' या आत्मचरित्रावर राज्य स्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते!या चर्चासत्रामध्ये बोलताना प्रज्ञा दया पवार यांनी प्रस्थापित कल्पना प्रणालीला विरोध करणाऱ्याच कल्पना ह्या नवीन प्रणालीची उभारणी करण्याचा एक संस्कृतीक प्रकल्प आहे. संपूर्ण वर्चस्वावादी अस जे प्रारूप आहे ते वर्चस्वावादी प्रारुप स्पष्टपणे उधळून लावण्याची एक राजकीय भूमिका नारायण भोसले यांनी देशोधडी सारख्या आत्मकथनातून घेतलेली आहे अशी भुमिका मांडली.
तसेच वंचितांचा, अंकितांचा, शोषितांच्या जो काही शतकांनो-शतकाचा प्रवास व गेल्या ४०,४१ वर्षांमध्ये भटक्या जमातीच्या जगण्यामध्ये कुठलाही अर्थपूर्ण बदल झाला आहे का?
बलुत, उपरा आणि त्या काळातील सगळी अशी पोटामध्ये शुब्ध खळबळ घेऊन लाटा मागून लाटा येत गेल्या आत्मकथनांच्या. तर त्याच्यामध्ये ज्या अर्थनिर्णयांच्या खुल्या शक्यता होत्या, वाचनक्रियेच्या आणि विश्लेषणाच्या खुल्या जागा होत्या त्या मला देशोधडी मध्ये दिसत नाही. इथे लेखकाची जी काही एजन्सी आहे त्यामध्येच बदल या सगळ्या परिस्थिती मुळे पडलेला आहे का? की लेखक नावाची एजन्सी इथे बदलली आहे का? आणि या बदलेल्या एजन्सीमागे कळत नकळतपणे का होईना एका वर्गीय अश्या नॉम्स चा कुठेतरी पगडा किंवा प्रभाव आहे का?
Camera & Music - Atram Buddhewad
Special Thanks - SRTMU Nanded, Prof Dlilp Chavan
Contact - Marshall's Book Cafe - +91-9637651304,
[email protected]
Instagram - https://www.instagram.com/marshalls_book_cafe/
Facebook - https://www.facebook.com/Marshalls-book-cafe-104504468158327/
Twitter - https://twitter.com/marshallsbookc1?/
https://spotifyanchor-web.app.link/e/tPZWlSLpItb
#देशोधडी #नारायणभोसले #राज्यस्तरीयचर्चासत्र #प्रज्ञादयापवार #booktalk #bookreview