दासबोध हा समर्थ रामदासांनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींनी केले. रायगड जिल्ह्यातील अत्यंत निबीड अरण्यात विसावलेल्या शिवथरची घळ या ठिकाणी हे लेखन झाले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.
एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांच्या, साधकांच्या, निस्पृहांच्या, विरक्तांच्या, सर्व सामान्यांच्या, बालकांच्या, प्रौढांच्या,जराजर्जरांच्या अशा सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांच्या मानवी मनाला उपदेश केला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात.