दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. एकेका समास एक एक विषय घेऊन रामदास स्वामींनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात.