कवि द.मा.धामनस्कर यांची वसतू ही कविता मुक्तछंद प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली,की ती वस्तू अनमोल ठरते.वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात.