आपल्या सर्वांच्या आयुष्यात योगायोगाने अनेक गोष्टी घडून येतात. व्यक्ति आयुष्यात अकस्मात येतात त्यांना आपण जीव लावतो. काही आपल्याला अजिबातच रुचत नाहीत. त्यापैकी काही आयुष्यात रहातात तर काही अकस्मात निघूनही जातात. भगवद्गीतेतील एक श्लोक सुपरिचितच आहे. मात्र आयुष्यातील हे योगायोग फक्त वैयक्तिक आयुष्यापुरतेच सीमित असतात असे काही नाही. पुष्कळ वेळा तुमची करियर, व्यवसाय हे सुद्धा योगायोगाने बद्लू शकतात.