शहरातील वर्कशाप ते अजिंठा चौफुलीदरम्यान भरणार्या भंगार बाजारावर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करीत रस्त्यावरील अतिक्रमणांसह बोर्ड, फलके काढण्यात आली. उपायुक्त वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिस बंदोबस्तात करण्यात आली. सकाळी 10 ते 10.30 पासून या कारवाईस सुरूवात करण्यात आली. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.