नैसर्गिक आपत्ती, किडी आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा संरक्षण देण्यासाठी खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात आली होती. ग्रामीण भागातील शेतकर्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या अडचणी आणि गेल्या वर्षीची कमी मिळालेली नुकसान भरपाई यामुळे यावेळी या योजनेस केवळ 23 टक्केच प्रतिसाद मिळाला आहे.