
Sign up to save your podcasts
Or


1798 साली अर्थतज्ज्ञ थॉमस मॅल्थस म्हणाले होते की लोकसंख्या ज्या वेगाने वाढते, तितक्याच वेगाने जगभरात अन्नधान्य पिकवलं जात नाहीय. मॅल्थस यांच्यानुसार लोकसंख्या एकाचे दोन, दोनाचे चार अशा पद्धतीने वाढते, मात्र अन्नपदार्थांचं उत्पादन एकाचे दोन, दोनाचे तीन, तीनाचे चार, असंच होऊ शकते. म्हणजेच शंभर वर्षांमध्ये जगातील सर्व लोकांसाठी अन्नपुरवठा कदाचित कमी पडेल, असं त्यांचं म्हणणं होतं.
त्यांचं हे भाकित नेहमीच चर्चेत राहिलं, पण सुदैवाने प्रत्यक्षात तसं कधी झालं नाही. याच्या जवळपास 200 वर्षांनंतर अमेरिकन प्राध्यापक ख्रिस्तोफर बॅरट यांनी संयुक्त राष्ट्रात एका भाषणात म्हटलं की, येत्या काळात मानवापुढचं सगळ्यात मोठं संकट असेल अन्नाचा तुटवडा.
जगाची लोकसंख्या आज सुमारे 770 कोटी आहे, 2100 पर्यंत ही वाढून अगदी 1,100 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – वाढत्या लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी आपल्याकडे पुरेसं अन्नधान्य असेल का?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
By BBC Marathi Audio4.2
55 ratings
1798 साली अर्थतज्ज्ञ थॉमस मॅल्थस म्हणाले होते की लोकसंख्या ज्या वेगाने वाढते, तितक्याच वेगाने जगभरात अन्नधान्य पिकवलं जात नाहीय. मॅल्थस यांच्यानुसार लोकसंख्या एकाचे दोन, दोनाचे चार अशा पद्धतीने वाढते, मात्र अन्नपदार्थांचं उत्पादन एकाचे दोन, दोनाचे तीन, तीनाचे चार, असंच होऊ शकते. म्हणजेच शंभर वर्षांमध्ये जगातील सर्व लोकांसाठी अन्नपुरवठा कदाचित कमी पडेल, असं त्यांचं म्हणणं होतं.
त्यांचं हे भाकित नेहमीच चर्चेत राहिलं, पण सुदैवाने प्रत्यक्षात तसं कधी झालं नाही. याच्या जवळपास 200 वर्षांनंतर अमेरिकन प्राध्यापक ख्रिस्तोफर बॅरट यांनी संयुक्त राष्ट्रात एका भाषणात म्हटलं की, येत्या काळात मानवापुढचं सगळ्यात मोठं संकट असेल अन्नाचा तुटवडा.
जगाची लोकसंख्या आज सुमारे 770 कोटी आहे, 2100 पर्यंत ही वाढून अगदी 1,100 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – वाढत्या लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी आपल्याकडे पुरेसं अन्नधान्य असेल का?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज

9 Listeners

0 Listeners

2 Listeners

1 Listeners

12 Listeners