
Sign up to save your podcasts
Or


दिवस मान्सूनचे आहेत. महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पण राज्यातले काही जिल्हे अगदी भर पावसातही अनेकदा कोरडे राहतात.
बेसुमार वृक्षतोड, अतिचराई, शेती, औद्योगिकरण अशा अनेक कारणांमुळे राज्याच्या 44.93 टक्के भागाचं तर भारताच्या 23 ते 29 टक्के भागाचं वाळवंटीकरण होत आहे.
2017 साली इस्रो आणि स्पेस अप्लिकेशन सेंटर यांच्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली होती.
परिस्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाय सुरू झाले, पण वाळवंटीकरणाची टांगती तलवार दूर झालेली नाही. तसंच ही समस्या फक्त महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित नाही.
जगात सर्वांत मोठं वाळवंट असलेलं सहारा वाळवंटही आणखी पसरत चाललं आहे. त्याला आळा घालण्यासाठी एक हिरवी भिंत उभारण्याचे प्रयत्न गेल्या दोन दशकांत झाले होते. भारतातही अशी एक भिंत उभारली जाते आहे.
आफ्रिकेतल्या मूळ प्रकल्पाचं काय झालं? त्यातून भारतानं काय शिकायला हवं, जाणून घेऊयात.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी
By BBC Marathi Audio4.2
55 ratings
दिवस मान्सूनचे आहेत. महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पण राज्यातले काही जिल्हे अगदी भर पावसातही अनेकदा कोरडे राहतात.
बेसुमार वृक्षतोड, अतिचराई, शेती, औद्योगिकरण अशा अनेक कारणांमुळे राज्याच्या 44.93 टक्के भागाचं तर भारताच्या 23 ते 29 टक्के भागाचं वाळवंटीकरण होत आहे.
2017 साली इस्रो आणि स्पेस अप्लिकेशन सेंटर यांच्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली होती.
परिस्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाय सुरू झाले, पण वाळवंटीकरणाची टांगती तलवार दूर झालेली नाही. तसंच ही समस्या फक्त महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित नाही.
जगात सर्वांत मोठं वाळवंट असलेलं सहारा वाळवंटही आणखी पसरत चाललं आहे. त्याला आळा घालण्यासाठी एक हिरवी भिंत उभारण्याचे प्रयत्न गेल्या दोन दशकांत झाले होते. भारतातही अशी एक भिंत उभारली जाते आहे.
आफ्रिकेतल्या मूळ प्रकल्पाचं काय झालं? त्यातून भारतानं काय शिकायला हवं, जाणून घेऊयात.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी

9 Listeners

0 Listeners

2 Listeners

1 Listeners

11 Listeners