नंदुरबार जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने पुनरागमन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हयातील नदीनाल्यांना पूर आले आहे. शहादा येथील गोमाई नदीला मोठा पूर आला आहे. संततधार पावसामुळे काही घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.