शहरातील रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे, खड्ड्याच्या त्रास सहन करत असतांना दुसरीकडे प्रचंड धुळीमुळे नागरिक हैराण आहे. रस्त्याच्या दुरूस्ती करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवार, 30 ऑगस्ट रोजी महापालिकेवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नादुरूस्त रस्त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीनेही सहभाग नोंदवून महापालिकेचा निषेध व्यक्त केला.