चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यात शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, वाकडी येथील 60 वर्षीय महिला पुरात वाहून गेली आहे. याचबरोबरच शेकडो जनावरे वाहून गेली असून अनेक जनावरे जागेवरच मृत्यूमुखी पडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे आदेश यंत्रणेला दिले आहेत.